तीळ - लागवड तंत्रज्ञान

 


तीळ हे भारतातील सर्वात जुने तेलबियाचे पीक असून जगात तिळाखालील क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत भारताचा प्रथम क्रमांक लागतो. तिळाच्या तेलास जागतिक बाजारपेठेत फार मागणी असून, प्राचीन काळापासून तिळाचे तेल खाद्य तेल म्हणून वापरल्या जाते.

हवामान व जमीन : 

तीळ पीक खरीप, अर्ध-रबी, उन्हाळी या सर्व हंगामात घेता येते. या पिकास २५ ते २७ अंश से. उष्णतामान पोषक असून सतत येणाऱ्या पावसाचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. पाणी साचून ठेवणाऱ्या जमिनी योग्य नाहीत. अर्थ रबी हंगामासाठी ओलावा धरून ठेवणारी भारी जमीन निवडावी.

पूर्वमशागत व भरखते:

 १. तिळाचे बियाणे बारीक असल्याने जमीन चांगली तयार करावी. उन्हाळ्यात उभी आडवी वखरणी करावी व शेवटच्या वखरणीच्या वेळेस १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून जमीनीत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. काही कचरा वेचून शेत स्वच्छ करावे व पठाल फिरवून पेरणी करावी.

२. अर्ध रबी हंगामात वखराच्या पाळ्या देऊन जास्तीत जास्त पाणी शेतात मुरवावे.

पूर्वमशागत व भरखते :

 १. तिळाचे बियाणे बारीक असल्याने जमीन चांगली तयार करावी. उन्हाळ्यात उभी आडवी वखरणी करावी व शेवटच्या वखरणीच्या वेळेस १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून जमीनीत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. काडी कचरा वेचून शेत स्वच्छ करावे व पठाल फिरवून पेरणी करावी.


२. अर्ध रबी हंगामात वखराच्या पाळ्या देऊन जास्तीत जास्त पाणी शेतात मुरवावे. बियाण्याचे हेक्टरी प्रमाण खरीप व अर्ध-रबी हंगामाकरिता प्रति हेक्टरी १.५ ते २.० किलो व उन्हाळी हंगामाकरिता ३.० ते ४.० किलो बियाणे वापरावे.

बीज प्रक्रिया: 

पेरणीपूर्वी थायरम, कार्बेन्डाझिम किंवा ब्रासिकॉल यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी.

पेरणीची वेळ : 

खरीप जूनचा शेवटचा किंवा जुलैचा पहिला आठवडा. अर्ध-रबी सप्टेंबरचा पहिला पंधरवाडा, उन्हाळी फेब्रुवारीचा पहिला पंधरवाडा.

पेरणीची पध्दत : 

बियाणे फार बारीक असल्यामुळे त्यात समप्रमाणात वाळू/गाळलेले शेणखत/राख/माती मिसळावी. पाभरीने / तिफणीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.


आंतरपीक तीळ हे आपात्कालीन पीक, आंतरपीक आणि मिश्र पीक म्हणून घेता येते. आंतरपीक पध्दतीमधे तौळ मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१), तीळ+ कपाशी (३:१) हे फायदेशीर आढळून आलेले आहे. रासायनिक खताची मात्रा, वेळ पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र (१२.५ कि./हे.) व पूर्ण स्फुरद (२५ कि./हे.) देऊन उरलेल्या नत्राचा दुसरा हप्ता (१२.५ कि./हे.) पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावा. एकेटी-६४ या वाणाकरिता रासायनिक खताची मात्रा ४० किलो नत्र व २५ किलो स्फुरद/हे. एवढी द्यावी. तसेच पेरणीच्या वेळेस झिक व सल्फर (या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास) जमिनीत २० किलो/हे या प्रमाणात दिले असता उत्पन्नात वाढ होते. तीळ पिकाच्या अधिक आर्थिक मिळकतीकरीता रासायनिक खताच्या मात्रे सोबतच पीक फुलावर असतांना व बोंड्या धरण्याच्या वेळेस २ टक्के डी.ए.पी. ची फवारणी करण्याची शिफारस करण्यात येते.

विरळणी / खाडे भरणे :

पेरणीनंतर ७-८ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर १५-२० दिवसानी पहिली व तद्नंतर ८ दिवसानी दुसरी विरळणी करून दोन रोपात १०-१५ सें.मी. अंतर ठेवावे. म्हणजे शेतात हेक्टरी २.२५ ते २.५० लाख रोपांची संख्या राहील. आंतरमशागत व तण व्यवस्थापन आवश्यकतेनुसार २-३ कोळपण्या खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू असल्यामुळे पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही याची काळजी घ्यावी. 

ओलीत व्यवस्थापन : 

उन्हाळी पिकास / अर्थ रबी पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२-१५ दिवसानी ओलीत करावे. फुलोन्यास सुरुवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास संरक्षक ओलीत द्यावे ओलीत करताना पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावो

कापणी व मळणी :

 तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास बोंड्या फुटून बी सांडते व नुकसान होते. त्यामुळे कापणी वेळेवर करावी. झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरूवात होताच पीक कापणीस तयार झाले असे समजावे. कापणी केल्यावर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात. ३-४ दिवसानी बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या सहाय्याने तीळ झाडावे. काही बोंड्या तडकल्या नसल्यास ४-५ दिवसानी परत पेंड्या झाडाव्या आणि बियाणे स्वच्छ करून व वाळवून साठवावे. 

हेक्टरी उत्पादन :

 तिळाच्या पिकापासून हेक्टरी ८-१० क्विंटल उत्पादन मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या